नाशिक : ‘विरोधी पक्षातील नेत्यांचा तोल गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते विरोध करतात असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. CAA बाबत मुस्लिम समाजातील नागरिकांना काही अडचण असेल, तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, अशी भूमिकाही आठवलेंनी घेतली आहे.

 

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी त्यांनी वरील गमतीशीर वक्तव्य करत सभागृहात हशा पिकवला. तसेच विरोधकांवर टीकास्त्रही सोडले. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोधक संंभ्रम निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले.

 

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत मला मंत्रिपद आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी आहेत. ये मोदी और मेरे अंदर की बात है, असं गंमतीशीर विधान रामदास आठवले यांनी केलं.

 

दरम्यान, सीएए बाबत मुस्लिम समाजातील नागरिकांना काही अडचण असेल, तर मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर देशाचं संविधान कसं असतं हे सांगता येत नाही. आंबेडकरांनी देशासाठी केलेलं कार्य कधीही न विसरता येणारं आहे, असे ते म्हणाले.

                                                        

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: