मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवून देण्याच्या धमकीला एक दिवस उलटत नाही तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमक्यांचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनाही धमकी मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 या सर्व प्रकरणांवर आता याप्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ‘धमकी कोण देत आहे, याची चौकशी झाली पाहिजे.असले प्रकार कुणी जाणिवपूर्वक तर करत नाही ना? ही लोकं खरी आहेत का खोटी आहेत, हे प्रकरण किती गंभीर आहे किंवा नाही, अशी शंका फडणवीसांनी घेतली.

उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शरद पवारांनाही भारताबाहेरुन धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धमकीचा हा फोन आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर कंगना राणौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याचं बोललं जात आहे .

दरम्यान कंगणा रणौतवर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यानंतर हे असे फोन येत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत आहेत. धमकीचे फोन आल्याप्रकरणी क्राईम ब्रांच तपास करत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती. त्यानंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईवरून धमकीचा फोन आला होता. मातोश्रीप्रमाणेच वर्षा बंगल्यावरही अशाप्रकारचा फोन आल्याचं सांगण्यात आलं आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: