लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच नेते सक्रीय होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी व विरोधीपक्ष नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर चांगलाच शाब्दिक निशाणा साधला. यवतमाळ येथे आयोजित महापर्दाफाश सभेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या या भाजप-शिवसेना सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मातीत गाडा, असे पटोले म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पत्नी अमृता फडणवीस यांना बढती देण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक विभागांचे सरकारी खाती मुख्यमंत्र्यांनी अॅक्सिस बँकेत वळविली आहे असा आरोप पटोले यांनी केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी-कॉंग्रेस ला मोठ्या प्रमाण गळती लागली आहे. यामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेस मध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.                                                                                                                                                                                                           

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: