मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मित्र पक्षाला विधानसभेत जनतेकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी सर्व जनतेचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी हे युती सरकार जाता जाता राहिलंय अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली.
या निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग झाला, लाखो-करोडो रुपये जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आले, विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचे काम झाल्याचे मलिक म्हणाले.
राज्य सरकारने दिलेल्या वचनाची पूर्तता केली नाही यातून जनतेत नाराजी वाढली. सरकार चांगले काम करत असेल तर त्यांच्या निर्णयांना पाठिंबा दिला जाईल मात्र जनविरोधी काम होत असल्यास एक जबाबदार विरोधक म्हणून पक्ष काम करेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
click and follow Indiaherald WhatsApp channel