मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुका फक्त दोन महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप शिवसेनेने यात युती झाली असून अर्ध्या-अर्ध्या जागा मिळून लढविण्याचे दोन्ही पक्षांनी ठरवले आहे. मात्र त्याला अंतिम स्वरुप देण्यात आले नव्हते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत आज स्पष्टिकरण दिले. भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप हे भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठरविणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळणार आहे.

युतीतल्या मित्रपक्षांना जागा सोडून राहिलेल्या जागा अर्ध्या-अर्ध्या लढविण्याचे भाजप आणि शिवसेनेत ठरले आहे. काही जागांची अदलाबदल होण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. मात्र फारसी काही अडचण येणार नाही, असा अंदाच व्यक्त केला जातो. त्यामुळे लवकरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

बहूजन विकास आघाडीचे बोईसर विधान सभा मतदारसंघांचे आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कुठलेही टार्गेट नसून आमच्याकडे कोणते ही वॉशिंग पॉवडर नाही. शिवसेनेचे काम पाहता आकर्षित पक्ष प्रवेश होत आहेत. चांगले काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबायची चिन्हे नाहीत. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता दिसत असल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेचा वाट धरली आहे. मतदारसंघ शिवसेनेकडे आहे की भाजपकडे याचा विचार करून नेते त्या-त्या पक्षात करत आहेत. राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार लवकरच हातावरचे घड्याळ सोडून शिवबंधन बांधणार असल्याची शक्‍यता असून राष्ट्रवादीला पुन्हा मोठे भगदाड पडण्याची शक्‍यता आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: