सरकारकडून मांडण्यात आलेल्या कृषि विषयक विधेयकावर राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू आहे. या विधेयकावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दोन प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याचं म्हणत नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडल आहे.

मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही?, असे प्रश्न राहुल गांधींनी सरकारला विचारले आहेत. 

मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. 

कृषि क्षेत्राशी संबधित असलेल्या तीन विधेयकांपैकी दोन विधेयके आज प्रचंड गदारोळात राज्यसभेत मंजूर झाली. या विधेयकांना काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र विरोध केलाय.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: