महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली आहे. या निर्णयावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

सीबीआयला सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेने तपासाची परवानगी मिळते, राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागत नाही. आपले काळे धंदे लपवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

सरकारला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच काही गोष्टी लपवण्यासाठी असा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, सरकार स्थापन झाल्यापासून राज्याला कोरोना, पूर आणि अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करावा लागत आहे. हे सरकारच पणवती आहे, असं राणे म्हणालेत.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: