जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधी पक्षाचे नेते हल्लाबोल करीत आहेत. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. एक दिवस मलाही गोळी मारू शकतात. जे नथुराम गोडसेचे वारसदार आहेत, तेच असे करू शकतात, असे ओवेसी यांनी सांगितले.                

ओवेसी यांच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत मिळत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. त्यबाबत ओवेसी म्हणाले, की मी एक खासदार आहे; मात्र मला अरुणाचल प्रदेश किंवा लक्षद्वीपला जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. आसाममध्ये मी जमीन खरेदी करू शकतो का, असा त्यांनी सवाल केला. तसेच, सध्या जे जम्मू-काश्मीरसोबत झाले आहे. तसेच, नागालँड, मिझोरम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील लोकांसोबत होऊ शकते, असे ओवेसी म्हणाले.

काश्मीरमध्ये सध्या अघोषित आणीबाणी आहे. त्याठिकाणी फोन सुरू नाहीत किंवा लोकांना बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य नाही, असे सांगत ओवेसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. याशिवाय, आपल्या विरोधकांवर टीका करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, जे मला अँटी नॅशनल म्हणतात, ते स्वत: देश विरोधी आहेत. जर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे देशद्रोह नाही, तर जम्मू-काश्मीरमधील संचारबंदी लगेच हटविली पाहिजे.               

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: